अजूनही पत्रं लिहावी वाटतातआणि मी लिहिते
मरून गेलेल्या माणसांना जिवंत पत्रं
वार्याचं ऐकावं
पाण्यासोबत खळखळून हसावं
निजावं अंधार पांघरून काळादाट
उन्हात लाही व्हावं शुभ्र शुभ्र
झाडाची फांदी तुटते
पानं गळतात
मोहोर धरतो
फुलांची फळं होतात
म्हणजेच झाड उत्तरं देत असतं आपल्या प्रश्नांची
जुन्या खडबडीत खोडाजवळ बसून
अदृश्य मुळांचं आश्वासन स्मरून
झाडाशी बोलावं
ढगांत शोधावेत आकार
पाखरांत रंग
रंगवाव्यात इच्छा
रंगवावीत स्वप्नं
तशीच लिहावीत पत्रं
जर अजूनही लिहावीशी वाटतात
माणसं मरून गेलेली असली तरी
जिवंत असतातच
ढग पाखरू झाड उन्ह अंधार पाणी वारा बनून....
-Kavita Mahajan
-Kavita Mahajan
No comments:
Post a Comment